Wednesday, 28 December 2016

शेती आणि शेतकरी

व्यथा शेतक-यांच्या या
दावणीला बांधलेल्या,
कष्टांच्या या व्यथा बघा
वेशीवर टांगलेल्या........!..... (1)

अन्याय सरकारचा
होतो दिवसेंदिवस,
भाव मिळेना पिकांना
किती करावे नवस.......!...... (2)

झिजतो रोज मातीत
तरी पदरी निराशा,
यावे सुख दारी त्यांच्या
आहे मनी हिच आशा....!..... (3)

शेती करी दिन रात
वितभर पोटासाठी,
आशा करी वेडा जीव
भाव येण्या पिकासाठी....!.... (4)

धनधान्य कमावतो
वाहूनं घामाच्या धारा,
उभे पिक तो राखितो
सोसूनं पाऊस वारा.....!.....(5)

सा-या जगाचा आधार
हा पोशिंदा शेतकरी,
जेव्हा कसतो हा शेती
तेव्हा मिळते भाकरी......!.... (6)

अख्खे कुटुंब राबते
तन पिकात काढतो
शेती नांगरण्या सारी
बैलं औतास जुंपीतो....!...... (7)

कधी निसर्ग कोपतो
फळ कष्टाचे घेऊन,
पावसाच्या पुरामंदी
जातो वेदना देऊन.....!..... (8)

धरित्रीच्या कुशीमंदी
सारं जीवन अर्पितो
कोपलेल्या निसर्गाला
दान दैवाचे मागतो......!....(9)

हळहळ ह्रदयाला
वाहलेल्या पिकामुळं
किती सोसावा आघात
निसर्गाच्या घावामुळं.....!..... (10)

सुखी राहो बळीराजा
देवा एकच मागणं,
सुख येवो घरामंदी
सार्थ होऊ दे जगणं.....!..... (11)


-----------------गजेंद्र काळे
                 9623714011
                   (संभाजीनगर)






























No comments:

Post a Comment